मुंबईचा विकास आराखडा

• मुंबई शहराचा विकास आणि जडण घडण सुनियोजीत होण्यासाठी मुंबई महापालिकेने तिन विकास आराखडे तयार केले (१९६१, १९८१,२००१) अशा आराखडयांसाठी, मुंबई शहरासाठी तयार केलेला सन १८८८ चा कायदा याचे अधिष्ठान वापरले जाते.

• मुंबईच्या नियोजीत विकास प्रक्रीये करिता वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या गेल्या बॉम्बे सीटी इमप्रुव्हमेंट ट्रस्ट (१८९६), 3.1) (बॉम्बे डेव्हपमेंट डिपार्टमेंट १ ९ २० टाऊन पॅल्नींग (१९५४), बॉम्बे रिपेअर अँड रिपेअर बोर्ड (१९६९), महाराष्ट्र हौसींग ऐरीया डेव्हलपमेंट अथोरिटी (१९७३) अर्बन लॅन्ड सीलिंग अँक्ट (१९७६) एम.एम.आर.डी. आणि इतर तत्सम.

• आराखड्याची काही वैशीष्ठे सांगायची म्हणजे निरनिराळ्या कमिटीद्वारे नविन निकक्ष निर्माण केले त्यामध्ये एफ.एस.आय., टी.डी.आर, अँकोमोडेशन, रिर्झवेशन निरनिराळ्या भुखडासाठी वैगेरे.

• निरनिराळ्या सुविधासाठी आणि पायाभुत कामासांठी आराखड्या मध्ये आरक्षण हि पध्दत यशस्वीरित्या राबबली जाते. आराखड्याची अंमलबजावणी मात्र मुंबई महापालिका मागे पडल्याचे चित्र दिसते.

• मुंबई शहाराच्या ४३७ चौरस कि.मीटर, क्षेत्रफळतील जागा निरनिराळया कारणांसाठी वापरीली गेलेली आहे.त्यातील काही मुख्य म्हणजे उद्योग ५ टक्‍के, विमानतळ आणि बंदरे ३ टक्के, जंगल १५ टक्के, शेती ५ टक्के न वापरता येणा-या कठीण जागा ६ टक्के, समुद्र किनारे २ टक्के, मिठागर आणि तत्सम २० टक्के. शहरातील पाण्याचे साठे २ टक्के आणि उरलेली ४२ टकके निवास व्यापार वगैरे साठी हि टक्केवारी ब-याच अंशी सतत बदलत आहे.

• विकास आराखडा १९८१ ते २००१ या कालखंडा करिता कार्यावही करण्यासाठी साधरण रु. ३५०० ते ४००० हजार कोटी एव्हढा खर्च अपेक्षीत केला गेला होता. त्यात शिक्षण मनोरंजन पार्क बाजार, अग्नीशामनदल, गृहनिर्मा व… गोष्टी अंर्तभूत केल्या गेल्या होत्या.

• सन १९८१ ते २००१ च्या आराखड्यात निवास, व्यापार आणि उद्योग, विकसीत करू नये असे भुखंड, शाळा महाविद्यालय मोकळ्या जागा आरोग्य, स्मशान भुमी आणि इतर सुविधांचे आराक्षणासाठी तरतूद केली गेली.

• हि तरतूद करतांना निवासी लोकसंख्या घनता प्रत्येक एकरामागे २००ते ५०० लोकांचा निवास, एफ.एस.आय. ०.५, १.०, ३.५ असे ठरवले गेले.

• नगर आराखड्याचे निकस मुंबईच्या आराखड्यात समाविष्ठ करण्याचा प्रयत्न केला पण तो विविध कारणामुळे संपूर्णपणे यशस्वी होणार नाही व हे सत्य आहे अदा. प्रतयेक १००० लोकसंख्ये मागे ०.५ एकर मोकळ्या जागा एक एकर खेळाची मैदाने आणि बागबगीचे, शाळेत प्रतयेक विद्रयार्थ्यमगे २० ते २५ स्केवेर फिट जागा उपलब्ध असणे प्रत्येक १००० लोकसंख्ये मागे ४ खाटा (बेड) आणि प्रत्येक बेड मागे ९०० स्केवरफिट जागा उपलब्ध करने, प्रत्येक ६० हजार लोसंख्येमागे १ दवाखाना असणे, प्रतयेक ७५ हजार लोसख्येमागे साधारण २५ हजार स्केवरफिटाचे मार्केट असणे वगेरे निकष असावे लागतात.

• सन १९८१ ते २००१ च्या विकास आराखड्याप्रमाणे प्रामिकशाळा साधारण १३०० ग्रंथालय ७५, १६० प्रसुतीगृह १७०, दवाखाने २३० मोकळल्या जागा ३२०० . नभुती १८० मनोरंजन गृह साधारण १६० मार्केट साधारण ३७० नंबर अग्नीशमन मुंबई शहरासाठी प्रस्थापित केले गेले.

• वरील सर्व आरक्षणे महापालीकेने अस्तीत्वात आणणे शक्‍य झाले नाही त्याचे कारण निरनिराळ्या जागेवर असलेली अतिक्रमाने. त्याच प्रमाणे जमीन ताब्यात घेण्यासाठी उपलब्ध असलेली निधी पुशकळ कमी होता, आणखी बरीच कारणे नियोजन आराखडा मोठया प्रमाणावर यशस्वी न होण्यामागे आहेत.

• तिनही आराखडे अस्तीलात येणा-या टक्का १० ते १५ टक्के आहे.

• खाजगी सरकारी भुखंडावरील प्रकल्प नियम आणि अटी ‘).€. २१५०१५ द्वारे चांगल्या प्रकारे नियोजित केले जात आहे.

• नुकताच प्रसिध्द झालेला २०३४ पर्यंतचा नियोजीत आराखडा चांगल्या प्रकारे अबलत यावा अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *